गाय गोठा योजना 2025

आज आपण पाहणार आहोत गाय गोठा अनुदान योजना 2025 याबद्दलची सविस्तर माहिती.

आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे .
आपल्या देशात अनेक लोक शेतीबरोबर जोडधंदा करत आहेत.
जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करतात.
पशुपालनामध्ये गाईचे पालन करणे हे सर्वात सोपे पशुपालन आहे,
 परंतु आज ग्रामीण भागामध्ये गाई किंवा म्हैस साठी राहण्याची व्यवस्थित सोय नाही .
पर्यायाने या जनावरांना ऊन ,वारा, पाऊस यांचा त्रास होतो.
 या सर्व बाबींचा विचार करून आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यायचा निर्णय घेतला.
चला तर मुद्द्याचं बोलू.
 सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 अर्ज प्रक्रिया नुकतीच चालू करण्यात आलेली आहे.
राज्यात २०२३ पासून हि गाय गोठा योजना राबवली जात आहे.
 यासाठी सरकारने तब्बल ७८००० पर्यंतची मदत सरकार शेतकऱ्यांना करणार आहे.
या योजनेमधून शेती बरोबर जोडधंदा करताना शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायामध्ये मोठी उलाढाल करणे सोप्पे होणार आहे.
याच्यामुळे पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाव मिळण्यास मदत होणार आहे .
गाय गोठा अनुदान योजना 2025 योजनेंतर्गत २ ते ६ जनावरे असतील तर ७७ हजार ८८८ रुपये खात्यावर जमा होईल.
१२ जनावरे असतील तर १ लाख ५५ हजार अनुदान खात्यावर जमा होईल.
१८ जनावरे असतील तर २लाख ३१ हजार अनुदान खात्यावर जमा होईल.
ज्या शेतकऱ्यांकडे शेतात २० ते ५० फळझाडे आहेत आणि त्यात त्यांनी जर मुक्त गोठा करायचा असेल तर छत नसलेले गोठे या योजनेतून करता येतील .
ज्या शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा अधिक फळझाडे आहेत त्यांना या योजनेतून छतासहित गाय गोठा मिळेल.
शेतकऱ्याकडे योग्य पद्धतीचे गोठे असल्यास जनावरांचे पालनपोषण चांगले होण्यास मदत होईल ,त्याच्यामुळे व्यवसायात वाढ होईल ,गाईंचे आरोग्यही उत्तम राहील .
मुद्दा क्रमांक १) गाय गोठा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कसा होईल
जनावरांचे पालन पोषण योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल .
शेतकऱ्याला याच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत .
दुध उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर चालना भेटेल
या योजनेमुळे शेतकऱ्याला जनावरांचे उन वारा पाऊस यांपासून संरक्षण करता येईल .
पशुपालनामध्ये वाढ होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल .
मुद्दा क्रमांक २) गाय गोठा अनुदान योजना साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
आधार कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, अर्जदार शेतकऱ्याचा सातबारा, ८ अ,
क्षेत्राचे ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र, ज्या जागेत गोठा करायचा आहे त्या जागेचा फोटो,
जागेची पाहणी केलेल्या अधिकाऱ्याचा पाहणी अहवाल, रहिवासी दाखला, मोबाईल क्रमांक
पासपोर्ट फोटो, स्वघोषित प्रमाणपत्र, जातीचा दाखला
मुद्दा क्रमांक ३) गाय गोठा योजना पात्रता काय आहे ?
गाय गोठा योजनासाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतच्या हक्काची जमीन असणे आवश्यक .
राज्यात ग्रामीण भागात ,दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकरी याचा लाभ घेवू शकतात .
अर्जदार शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला आवश्यक
जमिनीचा सातबारा, ८ अ असणे आवश्यक
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाईल
अर्जदार शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेस पात्र राहत येईल
अर्जदार महिला असल्यास पतीच्या निधनाचे प्रमाणपत्र आवश्यक .
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदार शेतकऱ्याकडे २ जनावरे असणे आवश्यक आहे.
यापूर्वी जर केंद्र , राज्य सरकार कडून अर्जदार शेतकऱ्याने गाय गोठा साठी अनुदान घेतले असल्यास ,या योजनेस अपात्र असेल.
द्रारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या अर्जदार शेतकऱ्याला विशेष प्राधान्य दिले जाईल.
मुद्दा क्रमांक ४) योजनेची वैशिठ्ये काय आहेत
गाय बैल म्हैस या जनावरांसाठी पक्का गोठा व्हावा यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करत असते .
या योजनेचा अर्ज करण्यास अडचणी येत नाहीत ,अतिशय सोप्प्या पद्धतीने हा अर्ज करता येतो .
या योजनेमधून मिळणारी रक्कम हि बँकेच्या खात्यावर १००% जमा होते असते .
या योजनेला शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुद्धा म्हंटले जाते
मुद्दा क्रमांक ५) गाय गोठा योजना 2025 अनुदान कसे असेल?
शेतकऱ्याकडे २ ते ६ जनावरे असतील तर ७७हजार ८८८ रुपये मिळतील.
६ ते १२ जनावरे असतील तर१ लाख ५५ हजार रुपये मिळतील.
१२ ते १८ जनावरे असतील तर२ लाख ३१ हजार रुपये मिळतील.
मुद्दा क्रमांक ६) योजनेसाठी अर्ज कसा करावा?
अर्जदाराने गाय गोठा अनुदान योजना अर्ज करण्यासाठी जवळच्या (स्वतःच्या गावच्या ) ग्रामपंचायत मध्ये जाणे आवश्यक आहे .
ग्रामपंचायत मधून आपल्याला गाय गोठा योजना अर्ज घ्यायचा आहे .
अर्जदाराने अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावीत.
अर्ज भरून झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये विशिष्ठ कर्मचाऱ्याकडे अर्ज जमा करावा.
शेतकरी बांधवांनी गाय गोठा योजना साठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज करावा.
अर्जामध्ये संपूर्ण माहितीसह ,जमिनीची माहिती ,जनावरांची माहिती द्यावी सोबत सर्व कागदपत्रे जोडावीत
अर्ज केलेल्या शेतकऱ्याने जर सर्व अटीची पूर्तता केली असेल तर अर्ज त्वरित मंजूर होतात.
मुद्दा क्रमांक ७) गाय गोठा बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली बनवलेली आहे ती पाहू.
२ ते ६ जनावरांच्या गोठ्यासाठी गोठा हा २६.९५ चौ मी निवारा असावा ,लांबी ७.७० मी व रुंदी ३.५० मी असायला हवी
२ ते ६ जनावरांची गव्हाणही सरकारी नियमानुसार ७.७ मी *२.२ मी *०.६५ मी असायला हवी.
जनावरांच्या मुत्र संचयासाठी २५० लिटर ची टाकी बांधणे आवश्यक आहे.
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी २०० लिटर टाकी बांधणे आवश्यक आहे.
मुद्दा क्रमांक ८ ) गाय गोठा योजना अटी कोणत्या आहेत ते पाहू
एका कुटुंबात एकदाच या योजनेचा लाभ मिळेल
हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच लागू केलेली आहे ,त्यामुळे राज्यातील शेतकरीच लाभ घेवू शकतील.
अर्जदाराकडे २ ते ६ जनावरे असायला हवेत
प्रत्येक जनावरांचे टेगिंग करणे आवश्यक
अर्जदाराला पशुपालनाची माहिती तसेच अनुभव असणे आवश्यक
स्वतच्या जमिनीवर फळझाडे , वृक्षलागवड केलेली असावी.
गोठ्याचे काम सुरु करण्यापूर्वीचा फोटो
गोठ्याचे काम चालू असतानाचा फोटो
गोठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याचा फोटो गोठ्याच्या बांधकामासोबत
वरील सर्व गोष्टीचे फोटो अंतिम प्रस्ताव अहवालसोबत सादर करण्यासाठी ७ दिवसाचा कालावधी आहे .
तर मंडळी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://mahaegs.maharashtra.gov.in/
या वेबसाईट ला भेट द्या.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *